नांदेड जिल्हा हा तसा दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेला प्रदेश. याच जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील एका शेतकऱ्यानं अवघ्या काही दिवसांत ७०ते ८० हजार रुपयांचं उत्पन्न मिळवलं. याला कारणंही असंच आहे. सध्या शेती क्षेत्रात काळानुरूप मोठे बदल होताहेत. कारण पारंपारिक शेतील खर्च बराच असल्यानं शेतकरी फळबागा आणि फुलबागांची वळू लागला. हाच कित्ता गिरवत आणि त्याला मेहनतीची जोड देत हिमायतनगरमधील शेतकरी साईनाथ चप्पलवाड यांनी झेंडूची शेती करून विक्रमी नफा कमावला.
महत्वाच्या बाबी
१. साईनाथ चप्पलवाड यांनी घेतले झेंडूचे विक्रमी उत्पादन
२. त्यांनी फक्त ३० गुंठे शेतीत फुलवली झेंडूची शेती
३. झेंडू लागवड करून शेतकऱ्यांपुढं आदर्श निर्माण के ला
४. अजुन दिवाळीपर्यंत चांगलं उत्पन्न मिळण्याचा त्यांना विश्वास