बुलडाणा जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन आणि कापूस पिकांची दयनीय अवस्था झाली. त्यामुळं हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकऱ्यांवर ऐन सणासुदीच्या दिवसात संकट कोसळले.
महत्वाच्या बाबी
१. परतीच्या पावसामुळे खरीप पिकांची दयनीय अवस्था झाली
२. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका
३. सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी
४. पिकांचे मोठं नुकसान झाल्यानं बळीराजा कोलमडल्याचं चित्र