पीएम किसान सम्मान निधी योजना हा केंद्र सरकारचा प्रमुख कार्यक्रम आहे. ज्या अंतर्गत सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबे २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये प्रति वर्ष सहा हजाराच्या उत्पन्न समर्थनासाठी पात्र आहेत. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ३१ मे रोजी पंतप्रधान मोदींनी किसान योजनेचा ११ वा हप्त्याचे वाटप केले. अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती पुढील १२व्या हप्त्याची.
महत्वाच्या बाबी
१. १२ हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही
२. पीएम किसान योजनेचा १२ वा हप्ता लांबला
३. शेतकरी पाहताहेत १२ हप्त्याची आतुरतेने वाट
४. आता शेतकऱ्यांमध्ये संभ्रमतेचे वातावरण आहे