Just another WordPress site

जितेंद्र आव्हाड यांना अटक, ठाण्यात मॉलमध्ये प्रेक्षकाला झाली होती मारहाण

हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद करण्यासाठी गेल्यानंतर विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी केली जाणार आहे

हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत राज्यभरातील काही संघटनांनी विरोध केला आहे. हर हर महादेव या चित्रपटाचे शो राज्यभरातील चित्रपटांमध्ये दाखवू नयेत, यासाठी राष्ट्रवादी (NCP) काँग्रेससह संभाजी ब्रिगेड यांसह विविध संघटनांनी या शो बंद पाडले होते.

ठाण्यातही जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विवियाना मॉलमध्ये जाऊन शो बंद पाडला होता. त्यावेळी कार्यकर्त्यांसोबत प्रेक्षकाची झटापट झाली होती. एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत होतं. त्यानंतर आव्हाड यांच्यावर टीका झाली होती. आता या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ठाण्यातील वर्तक पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे.

याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो, नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले.

मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं की, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की मी काही करू शकत नाही. वरून आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही, असंही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!