Just another WordPress site

काय सांगता! ‘या’ तरुणीच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले राज्यातील ४५ बडे नेते; राज्य सरकार कधीही कोसळू शकतं

आपल्या महाराष्ट्रात आपण लहानपणापासून ऐकत आलो की, सगळा नाद असावा पण रम, रमा अन् रम्मीचा नाद नकोच. हा विचार साधा वाटत असला तरी त्याचा अर्थ गहण आहे. थोडक्यात सांगायचं तर लै भारी फिलॉसॉफी आहे यार ही. हे आता सांगण्याची कारणं म्हणजे ओडिशातील एक प्रकरण सध्या सबंध देशात गाजतेय. इतकंच काय यामुळे तेथील राज्य सरकारही धोक्यात येऊ शकतं. त्यामुळंच ओडिसातच नव्हे तर देशात खळबळ उडाली. त्याचं झालं असं की,

राजकारणी, उद्योजक, व्यापारी व चित्रपट निर्माते अशा बड्या लोकांना एका ललालेने आपल्या मोहपाशात ओढलं. आपल्या सौंदर्याच्या जादूने त्यांची मती गुंग केली. त्यांच्यासोबत एकांतात ‘तसले’ क्षण घालवले. पण.. त्यांच्या नकळत या क्षणांची नको ती छायाचित्रे, व्हिडिओ घेतले. नंतर ते सार्वत्रिक करण्याची धमकी देत
ब्लॅकमेल करून कोट्यवधी रुपये उकळले. आतापर्यंत तिने अशाप्रकारे ४५ जणांची फसवणूक केल्याचे उघड झालेय. पण, हा आकडा अजून वाढू शकतो. बदनामीच्या भीतीने अनेकजण तक्रार देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अर्चना नाग असे या तरुणीचे नाव आहे. ती २८ वर्षांची आहे. पोलिसांनी तिला अटक केलीय. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे.

अर्चना धनाढ्य आणि प्रभावशाली व्यक्तींशी मैत्री करायची. अर्चनाच्या ‘तसल्या’ रॅकेटची माहिती असल्याने हे लोक तिच्याकडे मुलींची मागणी करत. ती मुली पुरवून त्यांचे ‘त्या’ क्षणांचे चित्रीकरण करायची. व्हिडीओ उघड करण्याची धमकी देत खंडणी उकळायची.

पोलिसांनी आक्षेपार्ह व्हिडिओ असलेले पेन ड्राइव्ह आणि मोबाइल जप्त केले. यात अनेक चित्रपट निर्माते आणि राजकारण्यांचे व्हिडीओ असल्याचा संशय आहे. अर्चनाला गरिबीत आयुष्य जगायचे नव्हते. त्यामुळे तिने झटपट कमाईसाठी विलासी जीवनशैली जगण्यासाठी ‘अनैतिक’ मार्ग स्वीकारला.

अर्चनाकडे राजमहाल शोभावा असे आलिशान घर, परदेशातून आयात केलेल्या अंतर्गत गृहसजावटीच्या वस्तू, अनेक आलिशान कार, चार परदेशी कुत्रे आणि एक पांढरा घोडा आहे. आता तिच्या जीवनावर चित्रपट काढण्यात येणार आहे.

अर्चनाचे २०१५ पूर्वीचे जीवन अतिशय हालाखीत गेले. तिची आई मिळेल ती कामे करून संसाराचा गाडा हाकत होती. अर्चना २०१५ मध्ये भुवनेश्वरला आली. प्रारंभी तिने एका सुरक्षा एजन्सीत काम केले. नंतर ब्यूटी पार्लरमध्ये काम करू लागली. २०१८ मध्ये तिने बालासोर जिल्ह्यातील जगबंधू चंद याच्याशी लग्न केले. याच ब्यूटी पार्लरमध्ये काम करताना ती तसले रॅकेट चालवत होती.

अर्चनाचे सत्ताधारी खासदार व मंत्र्यांशी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर पटनायक सरकार कोसळू शकते, असा दावा विरोधी पक्ष काँग्रेसचे आमदार एस. एस. सलुजा यांनी केला आहे. पोलिसांनी अद्याप कोणाचेही नाव उघड केलेले नाही.

जगबंधू व अर्चनाची काही आमदार आणि प्रभावशाली लोकांसोबतची छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ माजली आहे. तिने २०१८ ते २०२२ या चार वर्षांच्या काळात ३० कोटींची संपत्ती जमा केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!