Just another WordPress site

पावसाने दडी मारल्याने शेतकरी धास्तावला, पीक वाचवण्यासाठी शेतकरी देतो पिकांना तांब्यानं पाणी

रत्नागिरी : यंदा समाधानकारक पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं पेरण्या केल्या.  मात्र पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावलं. असं असतानाच जुलैमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. मात्र, आता पुन्हा पावसाने चांगलीच दडी मारल्यानं शेतकऱ्यांची पिकं करपू लागली.


महत्वाच्या बाबी

१. पावसाने दडी मारल्यानं पिके करपू लागली

२. पिके वाचवण्यासाठी शेतकरी देतो तांब्यानं पाणी

३. शेतातील पिके सुकू लागल्याने शेतकरी चिंतेत 

४. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा 

जुलैमध्ये पावसाअभावी शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांच्या दुबार पेरणीचे संकट ओढवले. परिणामी,  शेकडो हेक्टरवर पेरणी केलेले बियाणं, खतं वाया गेल्यानं अगोदर आर्थिक संकटात  सापडलेला बळीराजा पुन्हा संकटात सापडला. दुबार पेरणी केल्यानंतर जुलैमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना समाधान लाभले. त्यामुळं दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र हा पाऊस  जवळपास महिनाभर चांगलाच कोसळल्यानं हाहाकार निर्माण झाला…  त्यामुळं शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, आधीच पावसाअभावी पेरण्या उशीरा झाल्या. त्यातच बुरशीजन्य रोगराईमुळे पिके संकटात सापडली… अशात आता रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून तेथील शेतकऱ्यांची चिंता वाढली. पावसाने दडी मारल्यानं पिके करपू लागल्याचं शिवारात चित्र आहे. त्यामुळं शेतकरी पुरता हताश झाला. मुसळधार पाऊसानंतर आता पावसानं दडी मारल्यनं  शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला. पेरणी केलेलं पीक चांगल उगवलं. मात्र, आता पाऊस नसल्यानं अन् जमिनीतली ओल आटल्याने उगवलेल्या पिकांचं भविष्य अंधकारमय झालं. त्यामुळं सध्या पिकाला पावसाची गरज आहे. पिके सुकू लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ज्या शेतकऱ्यांची पिकांना पाणी देण्याची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी चार दिवसांपासून पाणी देण्यास सुरुवात केली. तर ज्या शेतकऱ्यांकडे पाणी नाही, ते शेतकरी पीक वाचवण्यासाठी कळशी, तांब्याने पाणी देत असल्यांचं पाहायला मिळंत. रत्नागिरी जिल्ह्यात  जिरायती क्षेत्र जास्त असल्यानं येथील शेती पावसावर अवलंबून असते. मात्र, आता आठवड्याभरापासून पावसाने हुलकावणी दिल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. येत्या दोन दिवसात पाऊस पडला नाही, तर  खरीप हंगाम वाया जाऊ शकतो, अशी भीती शेतकरी व्यक्त करताहेत.दरम्यान, आज पाऊस होईल, उद्या पाऊस होईल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांची पिकं आता वाया गेल्यात जमा आहेत. पावसानं अशीच दडी मारली तर भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!