पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राजकीय व्यूहरचना अनेकदा चकित करते. केंद्रातील भाजप सरकारविरोधातील त्यांची आक्रमकता नेहमीच उफाळून येते. संधी मिळाली की भाजपविरोधाची धार तीव्र करायची ही त्यांची ठरलेली रणनीती. मात्र, आता ममता बॅनर्जी दुसऱ्या टोकाला जात मवाळ झाल्याचं दिसतं. नेमकं ममता दिदींनी अचानक यु टर्न का घेतला? त्यामागे त्यांची राजकीय खेळी काय? याच विषयी जाणून घेऊ.
महत्वाच्या बाबी
१. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केले होते संघाचे कौतूक
२. ‘केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायामागे मोदी नसतील’
३. ममता पुन्हा भाजप विरूध्द आक्रमक होणार का?
४. गैरव्यवहारामुळे ममतांकडून तडजोडीचे प्रयत्न सुरु