राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर बरीच गणिते बदलली. ठाकरे सरकारच्या काळातील अनेक गोष्टींना स्थगिती मिळाली. याचाच फटका एसटी महामंडळला बसण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून एसटी महामंडळाला देण्यात येणाऱ्या निधीवर निर्बंध लादण्यात आले. त्यामुळं ऐन सणासूदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बाबी
१. एसटी महामंडळाला देण्यात येणाऱ्या निधीवर निर्बंध
२. सणासूदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट
३. एसटीचे प्रत्येक महिन्याचे उत्पन्न ४५० कोटींच्या आसपास
४. एसटी कर्मचाऱ्यांना निदान वेतन तरी मिळणार की नाही?