मुंबई : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी२० वर्ल्ड कपसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वात निवड झालेला १५ सदस्यीय भारतीय संघ ५ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाकडे प्रयाण करणार आहे. १६ ऑक्टोबरपासून टी२० वर्ल्ड कप सामन्यांना सुरुवात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध २३ ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे.