ऐतिहासिक ठरलेल्या भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेची सांगता झाली. भारताची मंगळयान मोहीम ८ वर्षे आणि ८ दिवसांनंतर संपुष्टात आली. भारताने केवळ ६ महिन्यांचा कालावधी अपेक्षित धरून यान पाठवलेले असताना तब्बल १६ पट कालावधीपर्यंत ते संपूर्ण क्षमतेने कार्यरत राहिले होते. मंगळयानातील इंधन आणि बॅटरी संपल्याने ही मोहीम संपली.
महत्वाच्या बाबी
१. मंगळयानातील इंधन आणि बॅटरी संपली
२. भारतानं मंगळयान २०१३ ला लाँच केलं
३. मंगळयान मिशनसाठी ४५० कोटींचा खर्च
४. मंगळयान तब्बल ८ वर्षे राहिलं कार्यरत
भारतानं मंगळयान हे ५ नोव्हेंबर २०१३ ला लाँच केलं होतं. ते २४ सप्टेंबर २०१४ ला मंगळाच्या कक्षेत पोहोचलं होतं. त्या मिशनद्वारे भारत जगातील पहिला देश बनला होता जो थेट मंगळ ग्रहापर्यंत पोहोचला होता. आठ वर्षाच्या काळात मंगळयानाने मंगळावरील अनेक फोटो पृथ्वीपर्यंत पोहोचवले. यामुळे शास्त्रज्ञांना संशोधनात मोठा फायदा झाला. मंगळयान मिशनसाठी ४५० कोटी रुपयांचा खर्च आला होता. हाती आलेल्या माहितीनुसार, मंगळयानातील इंधन संपल्यानं मंगळयानासोबतचा संपर्क तुटल्याचं सांगितल्या जातं. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळयान त्याच्या नियोजित वेळेपेक्षा १६ पटीनं चाललं. मंगळयान मोहीम फक्त सहा महिन्यांसाठी चालवण्यात येणार होती, मात्र मंगळयानानं आठ वर्ष काम केलं. मंगळयानाने मंगळावरील अनेक फोटो पृथ्वीवर पाठवले आणि डेटाही पोहोचवला ज्यामुळे अंतराळातील जगाविषयी आणि मंगळाबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली. मंगळयानाने केलेलं हे काम केलं आहे जे आजपर्यंत कोणत्याही देशाच्या अंतराळयानाने केलेलं नाही. मंगळग्रहाची भौगौलिक, वायुमंडळातील प्रक्रिया, भूपृष्टावरील तापमान याची माहिती गोळा करणं हे काम मंगळयानाचं होतं.