बीड : पावसाने जुलै महिन्यात चांगलंच कमबॅक केलं होतं. जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पालवल्या होत्या. पण राज्यातील बहुतांश भागात असा मुसधार पाऊस झाला की, पिके पाण्यात गेल्याचं चित्र होतं. दरम्यान, आता पिके माल धरण्याच्या अवस्थेत असतांना पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला. जमिनीतली ओल आटल्याने पिकांचे भविष्य अंधकारमय झालेय. यामुळे शेतकरी मात्र पुरता धास्तावला.
महत्वाच्या बाबी
१. आता पावसाने दडी मारल्यानं पिके करपू लागली
२. शेतातील पिके सुकू लागल्याने शेतकरी चिंतेत
३. सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी
४. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा