निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनातून शेतकऱ्यांच्या पदरी उत्पन्न पडेल की नाही, याबाबत शंका आहे. मात्र, आता राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला. मध्यंतरीच्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले आहे त्याच्या भरपाईपोटी ३ हजार ५०१ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. मदतीचे बदललेले निकष आणि नुकसानीचे क्षेत्र लक्षात घेता ही रक्कम जाहीर करण्यात आली.
महत्वाच्या बाबी
१. शिंदे-फडणवीस सरकारकडून ३, ५०१ कोटींची मदत
२. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची घोषणा
३. थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आर्थिक रक्कम
४. २५ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना मिळणार मदत लाभ