माणगाव : मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर नजीक कशेडी घाट रस्त्यावर चोळई गाव हद्दीत भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये रिक्षा चालकासह ३ विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला. परिक्षा देऊन तीन विद्यार्थींनी एका रिक्षातून परतत होत्या. तर येत असताना रिक्षावर रेतीने भरलेला डंपर पलटल्याने रिक्षातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या अपघातामुळे गावावर शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, कशेडी घाट मार्गावर चोळई गावच्या वळणावर हा अपघात घडला. वाळूने भरलेला डंपर अचानक रिक्षावर उलटला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये रिक्षा चालक उमर बडुर, विद्यार्थांनी हलिमा पोतेरे, असिया बडुर, नाजनिन करबेलकर अशी मृतांची नाव आहेत. माणगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरातील या विद्यार्थिनी रिक्षाने खेड येथे परिक्षेसाठी गेल्या होत्या. परीक्षा आटोपून परतत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली असून चारही मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केलाय. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपये मदतीची घोषणा केली आहे. याबद्दलची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. तर या घटनेनंतर अधिकचा तपास चालू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.